अमित शहांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे अजितदादा पवार समर्थकांमध्ये नाराजी ; माजी आमदार विलास लांडेनी भाजप वरिष्ठांना पत्र लिहून व्यक्त केली नाराजी
- पुणे येथील भाजप पदाधिकारी मेळाव्यात केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांना भ्रष्टाचाराचा सरदार म्हणून केली होती टीका
- लोकसभा निवडणुकी दरम्यान शरद पवारांच्यावर भटकती आत्मा अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती टीका
- त्याचे पडसाद लोकसभा निवडणूक मतदानामध्ये उमटल्याची चर्चा
- आता भ्रष्टाचाराचा सरदार अशी टीका झाल्याने विधानसभा निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटू शकतात अशी व्यक्त केली जात आहे भीती
- शरद पवार हे निष्कलंक असल्याने टीका करू नये ; अजित पवार समर्थक मा.आमदार विलास लांडे यांची मागणी
लोकमान्य टाइम्स : ऑनलाईन राजकीय
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी पुणे येथील भाजप पदाधिकारी मेळाव्यात शरद पवार यांच्यावर ते भ्रष्टाचार करणाऱ्यांचे सरदार आहेत अशी बोचरी टीका केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासह अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधून ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने अजितदादा पवार गटाचे समर्थक माजी आमदार विलास लांडे यांनी अमित शहा यांनी केलेल्या टीकेबाबत नाराजी व्यक्त करीत अशा प्रकारची टीका थांबविण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे भाजप पक्षश्रेष्ठी यांच्याकडे केल्याचे मत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीं यांच्याशी बोलताना व्यक्त केले.
भटकती आत्मा या टीकामुळे लोकसभा निवडणुकीत पडसाद उमटले होते
भाजपाकडून सातत्याने शरद पवार यांना लक्ष करत त्यांच्यावर जहरी टीका होत असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभेदरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील जाहीर सभेत शरद पवार हे भटकती आत्मा असल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा खरपूस समाचार राष्ट्रवादी शरद पवार गटाने घेतला होता. त्याचबरोबर हे वक्तव्य अजित पवार यांना देखील पटलेलं नव्हतं. याचा फटका लोकसभेत बसला असल्याचं माजी आमदार विलास लांडे यांनी म्हटल आहे.
भ्रष्टाचाराचा सरदारचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटू शकतात
त्यामुळे अमित शहा यांनी शरद पवारांना भ्रष्टाचाराचा सरदार म्हणणं योग्य नसल्याचे म्हणत त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या वक्तव्याचा आगामी विधानसभेवर परिणाम होऊ शकतो, असे देखील त्यांनी अधोरेखित केल आहे. पुन्हा अशा प्रकारे शरद पवारांवर टीका करू नये म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माजी आमदार विलास लांडे यांनी पत्र दिले आहे. दरम्यान शरद पवारांवर टीका केल्याने त्यांचं मन व्यथित झाल्याचे हे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.