पिंपरी चिंचवडमहाराष्ट्रराजकीय

उठा उठा निवडणूक आली..जुनी येणी वसूल करण्याची वेळ झाली..

  • दगडाखाली हात असणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आले महत्व
  • देण्या घेण्यावरून रुसवे फुगवे ?
  • अधी हिशोब नंतर प्रचार ?
  • पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही झाले हुशार
  • नेत्यांच्या ट्रिकचा कार्यकर्त्यांकडून वापर
  • नाक दाबून तोंड उघडण्याचा प्रयत्न

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

विधानसभा निवडणुका ऐन भरात आल्या आहेत. मतदान २० नोव्हेंबरला होणार आहे. त्यादृष्टीने उमेदवार यांची यादी प्रथम जाहीर करण्याचा मान भारतीय जनता पार्टीने घेतला आहे. जवळपास ९९ उमेदवार घोषित करून आघाडी घेतली आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड आणि भोसरी मतदारसंघांचा समावेश आहे. आज किंवा उद्या दुपारपर्यंत महा विकास आघाडीचे उमेदवारही जाहीर होतील.

उमेदवारांकडून नाराजी नाट्यातून नेहमी बरोबर असणारे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी जो काही हिशोब व्यवसाय , भागीदारीत ? झाला होता त्यांचा हिशोब चुकता करून संबंधित प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रवाहात आणण्यासाठी उमेदवार आणि त्यांची टीम सक्रिय झाल्याने उठा उठा निवडणूक आली जुनी वसुली करण्याची वेळ झाली अशा खुमासदार चर्चा मात्र या मतदार संघात रंगल्याच्या पहावयास मिळत आहेत.

पिंपरी चिंचवड म्हटल की हजारात, लाखात अशी चर्चा नाहीच…ती असते कोट्यवधीच्या पुढे ; त्यामुळे या मतदारसंघातील लढतींकडे पूर्ण राज्याचे नेहमीच लक्ष लागून राहिले असते. पिंपरी चिंचवड शहर हे जगाच्या नकाशावर औद्यगिकनागरी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि या औद्योगिकनगरीची कामगारनगरी म्हणून भोसरीला ओळख निर्माण झाली आहे.

ग्रामपंचायत ते महापालिका या प्रवासात भोसरीचा कायापालट झाला. ज्या त्या वेळीच्या राज्यकर्त्यांनी आपल्या परीने भोसरी चा विकासाच्या दृष्टीने योगदान दिले. त्यामुळे आज भोसरीमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील विविध जाती धर्माची लोक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने गुण्या गोविंदाने रहात आहेत.

भोसरी विधानसभा मतदारसंघात भोसरीसह तळवडे ते दिघी पर्यंतच्या गावांचा समावेश झाला आहे. त्यांचा ही विकास सर्व पक्षांच्या योगदानामुळे झाला आहे. फक्त आम्हीच विकास केला असे म्हणणे चुकीचे होईल. प्रत्येक राजकीय पक्ष आणि स्थानिक पदाधिकारी यांचा यात मोठा वाटा आहे. महायुतीकडून उमेदवार अंतिम झाला आहे ; मात्र आघाडीकडून उमेदवारी आतापर्यंत अंतिम झालेली नाही. ती आज किंवा उद्या दुपारपर्यंत अंतिम होण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

निवडणुका जाहीर झाल्यामुळे मात्र प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह अडगळीत कार्यकर्त्यांना ही महत्व प्राप्त झाले आहे. त्यात प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये व्यवसाय, भागीदारीतून खटके? उडाले होते अशा वावड्या होत्या. ते खटके मिटविण्यासाठी काही अनुभवी ज्येष्ठ व्यक्ती प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अनेक महिने, वर्षे रखडलेली वसुली मिळण्यासाठी हीच योग्य वेळ आहे हे जाणून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वतःला प्रचारापासून बाजूला ठेवत एकला चलो रे ची भूमिका घेतल्याची ही कानाफुसी गावकी भवाकित होती.

आणि आपण जर हे विषय मिटविले नाही तर याचा फटका ज्या त्या गावात आणि त्याचा आसपासच्या गावात फरक पडेल या काळजीने हिशोब कमी जास्त करून विषय हातावेगळे करण्यावर भर दिल्याची ही चर्चा मतदार आणि राजकीय पक्षांमध्ये आहे ? त्यामुळे उठा उठा निवडणुका आल्या ….जुनी वसुली करण्याची वेळ झाली म्हणत नेत्यांचेच तोटके त्यांच्यावर वापरण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सरसावल्याची खुमासदार चर्चा मात्र भोसरी मतदार संघात रंगली आहे.

(परंतु वस्ताद हा शेवटी एक डाव राखून ठेवतोच …हे त्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला वेळ आल्यावरच कळते. आता मला कोंडीत पकडले ; मात्र आता मी जात्यात आहे आणि ते सुपात हीच वेळ बदलून सुपात असणारा जात्यात जातोच हे कोणा ज्योतिषाला विचारण्याची गरज नसते याबाबत ही ज्या त्या गावात चर्चा आहे.)