भारत पाकिस्तान सीमेवरील जवानांसोबत साजरी करणार छत्रपती शिवाजी महाराज जयंती
मराठा टायगर फोर्सच्या वतीने आयोजन
सैनिकांना शिवरायांची प्रेरणा मिळावी हा हेतू
शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने दिले जाणार पाच विशेष पुरस्कार
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या श्री तनोट राय माता मंदिर परिसरात येत्या 22 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. मराठा टायगर फोर्सच्या वतीने सीमा सुरक्षा बल आणि लष्कराच्या जवानांसोबत हा ऐतिहासिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

मराठा टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष आणि उत्सवप्रमुख संदीप लहाने पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात महाराष्ट्रीय पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम, शिव व्याख्यान आणि सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सीमा सुरक्षा बलातील अधिकारी, कर्मचारी करण्यात आले आहे. सीमा सुरक्षा बलातील अधिकारी, कर्मचारी आणि विविध सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने पाच विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

कार्यक्रमासाठी महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन्ही राज्यांतील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून, राजस्थानचे राज्यपाल यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास, त्यांचे जीवनचरित्र आणि स्वराज्य स्थापनेचे कार्य संपूर्ण देशभरातील जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे. तसेच सैनिकांना शिवरायांची प्रेरणा मिळावी हा या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे आयोजकांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.