पिंपरी चिंचवडपुणेबातम्या

आयटीयन्सला दिलासा ; वाहतूक समस्येतून होणार मुक्तता ?

  • एमआयडीसी प्रशासनाने कसली कंबर
  • लक्ष्मी चौकात चार पदरी उड्डाणपूल
  • छत्रपती शिवाजी महाराज चौक सहा पदरी रस्ता रुंदीकरण

लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड

हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क मधील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे यातून आमची मुक्तता केव्हा होणार याबाबत सातत्याने आयटीयन्स प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. आता हा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत. त्याअनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी ) पर्यायी रस्त्यांसह उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. या विकास कामामुळे भविष्यात आयटी पार्कमधील प्रवास जलद होण्यास मदत होईल.

लक्ष्मी चौकात होणार चार पदरी उड्डाण पूल

हिंजवडी आयटी पार्कमध्ये सध्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प प्रस्थावित आहे. त्यातील काही प्रकल्पाने एमआयडीसीने गती दिली आहे. हिंजवडीतील लक्ष्मी चौकात वारंवार  वाहतूक समस्या सोडविण्यासाठी या चौकात उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा पूल चारपदरी आणि ७२० मीटर लांबीचा असेल. त्यासाठी ४० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. या पुलासाठी च्या निविदा मागविण्याची प्रक्रिया अंतिम टप्य्यात असल्याची खात्रीलायक एमआयडीसी

सहा पदरी रस्ता रुंदीकरण
हिंजवडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्मशान भूमी या रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. हा रास्ता ९०० मीटर लांबीचा आहे. हा रस्ता सहा पदरी केला जाणार आहे.  यासाठी २४.७४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

टप्पा एक ते टप्पा तीन हा पाच किलोमीटर चां रस्ता जोडला जाणार

याचबरोबर आयटी पार्कमधील टप्पा एकपासून टप्पा तीनला जोडणार आहे. हा रास्ता पाच किलोमीटर लांबीचा आहे. त्यासाठी ५८४. १४ कोटी रुपये खर्च येईल. या दोन्ही रस्त्यांच्या जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहेत. याचबरोबर काही भूसंपादन करावे लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग ही जागा संपादित करून एमआयडीसी ला देणार आहे. त्यानंतर या दोन्ही रस्त्यांची कामे सुरु होतील असे विश्वनीय वृत्त आहे.  

उद्योगमंत्र्यांच्या आदेशामुळे एमआयडीसी प्रशासन गतिशील  

 राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील रस्त्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी विविध पायाभूत सोयी सुविधा च्या अनुषंगाने विविध विकासकामे हाती घेतली आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथील  वाहतूक समस्या वाढली आहे, त्याअनुषंगाने ती सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम देण्याचे आदेश  सामंत यांनी एमआयडीसी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे हिंजवडीतील दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाने काम हाती घेतले आहे अशी माहिती एमआयडीसी मुख्य अभियंता वानखेडे यांनी दिली आहे.