पार्थ पवारांच्या एक लाख रुपये भाग भांडवल असणाऱ्या कंपनीने १८०० कोटींची जमीन फक्त घेतली ३०० कोटीना ; उबाठा गटाचे अंबादास दानवे यांचा आरोप
- राजकीय वर्तुळत खळबळ
- प्रशासकीय यंत्रेनवर ही दानवे यांचा संशय
- पार्थ पवार यांची माध्यमाना आपण कोणतेच चुकीचे काम अथवा घोटाळा केला नसल्याची प्रतिक्रिया
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
ऐन निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार जमीन घोटाळ्याच्या भोवऱ्यात अडकल्याची चर्चा राजकीय गोटात जोरदार सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पार्थ पवार यांच्यावर १८०० कोटींची जमीन केवळ ३०० कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ ५०० रूपये मोजल्याचा आरोप केला आहे.
त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या आरोपाला पार्थ पवार यांच्याकडून माध्यमांना ‘आपण कोणतही चुकीचं काम अथवा घोटाळा केला नसल्याची’ फोनवरून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. अधिकची माहिती देण्यास मात्र पार्थ पवार यांच्याकडून नकार देण्यात आला आहे.
पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली, एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने ४८ तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ २७ दिवसांत हा व्यवहार झाला असे अंबादास दानवे म्हटले आहे.
अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे १ लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे १८०० कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं.
एक लाख रुपये भागभांडवल कोरेगाव येथे आय टी पार्क उभारण्याची तयारी कसे शक्य आहे हे
गंमत तर पुढे आहे..एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतानाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल
सरकारी यंत्रणा ही काय तत्पर झाली पहा
दुसरी बाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा.. कमाल झाली! २२ एप्रिल २०२५ रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या ४८ तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे २७ दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या ४० एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये ५०० फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र

